महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २६५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा.

शिवकालापुर्वी मराठ्यांच्या तलवारी…

By Discover Maharashtra Views: 3613 2 Min Read

शिवकालापुर्वी मराठ्यांच्या तलवारी…

शिवकालापुर्वी मराठ्यांच्या तलवारी थोड्याशा जाड परंतु लांबीला कमी असायच्या. मराठे उंचीने मध्यम असल्याने तलवारीची लांबी कमी असायची. परंतु जेव्हा महाराजांचा कालखंड आला तेंव्हा त्यांच्या लक्षात आले की मोगलांबरोबर मावळ्यांना दोन हात करावे लागतात. ते उंचीने आणी ताकदीने मराठ्यांपेक्षा जास्त आहेत. तेव्हा महाराजांनी यावर अभ्यास केला आणि त्यांच्या लक्षात आले की मराठ्यांची शारिरीक ठेवण लहान आणि त्यांच्या तलवारीची लांबी कमी यामुळे मराठा कितीही पराक्रमी असला तरी त्यांना मोगलांपुढे हार खावी लागत असे. महाराजांच्या दुरदर्शी बुद्धीला मराठ्यांच्या पराभवाचे प्रमुख कारण दिसु लागले. ते म्हणजे योग्य माणसाकडे योग्य पद्धतीने शस्त्र नसणे. मग त्यावर संशोधन चालू केले. यावर सर्व बाजुंनी म्हणजे शस्त्राचा धातु, लांबी, रूंदी, वजन, धार या सर्वांवर विचार करून नवीन शस्त्रे बनवायला घेतली.

पुर्वी ज्या तलवारी वापरत त्याला उघडी मुठ असायची. ती महाराजांनी मुठ बंद करून घेतली. एखादा तलवारीचा वार घसरून खाली हातावर आला तरी हात सुरक्षित राहतो यासाठी मुठीला आवरण लावलं. त्याच बरोबर तलवार जी थोडी जाड होती ती पातळ करुन एक फुटापर्यंत आणखी लांब केली. पाते लांब केले परंतु वजन वाढणार नाही याची काळजीही घेतली आणी शञुच्या मोठ्यातमोठ्या घावाने तलवार तुटणार नाही अशी व्यवस्था करून घेतली. त्यासाठी तलवारीला मधुन पन्हाळ ठेवला जाई. त्याचा प्रभाव इतका दिसुन आला की हे हत्यार पायदळासाठी उपलब्ध व्हावे अशी गरज मावळ्यांनी व्यक्त केली आणी अशा तलवारीला जगभरात मराठा तलवार म्हणून संबोधले जाऊ लागले.

महाराजांनी ही मराठा तलवार लांब केल्याने त्याचे टोकाकडील वजन यांचा तोल सांभाळताना मुठीवर वजन जास्त आल्यासारखे वाटे त्याला पर्याय म्हणून तलवारीच्या मुठीच्या मागे गज लावायला सुरुवात केली. ऐन प्रसंगी हा गजही शञुच्या डोक्यात खिळ्याप्रमाणे ठोकता येई. त्यामुळे तोल साधण्याबरोबर तलवारीच्या मारक क्षमतेचे आणखी एक वैशिष्ट्य आपोआप भरीला आले. अनेक प्रकारे ही तलवार चालवुन हाताला घाम येईल किंवा मुठ सैल झाल्याने हातातुन गळु नये, पकड एकदम मजबुत रहावी म्हणुन मुठीला आतुन गादीचा अस्तर लावुन घेतला म्हणुनच मराठे घोडखिंडीत सात तास सलग हत्यार चालवु शकले. मराठ्यांच्या या विकसित तलवारींना त्यातील वेगवेगळ्या वैशिष्ट्यांमुळे नावे पडली. जसे धोप, खांडा, फिंरग, कत्ती, समशेर इत्यादी. महाराजांच्या तलवारीही अशा खास वैशिष्ट्यांनी बनवलेल्या आहेत .
जय शिवराय

फोटो व माहिती साभार:- किल्ल्यांची आत्मगाथा

Leave a comment