महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २६५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा.

स्वराज्याचे पेशवे

By Discover Maharashtra Views: 3978 4 Min Read

स्वराज्याचे पेशवे शिवरायांच्या बालपणापासून ते मराठेशाही च्या अस्तापर्यंत

    1. सोनदेव विश्वनाथ उर्फ सोनोपंत बहुलकर (१६३०-१६४०) – ह्यांना शहाजीराजांनी जिजामाता व शिवरायांच्या सोबत पुणे जहागिरीचा कारभार बघायला नेमले होते , त्यांची पुढे महाबळेश्वर येथे जिजाऊंसह स्वर्णतुला ही केली होती , ते १६६५ मध्ये वारले.
    2. शामराज निळकंठ रांझेकर (१६४०-१६६१) – यांच्या जंजिऱ्याच्या अपयशामुळे व वतनाच्या लोभापायी त्यांना हे पद गमवावे लागले.
    3. नरहरी आनंदराव (१६६१-१६६२)
    4. मोरेश्वर त्र्यंबक उर्फ मोरोपंत पिंगळे (१६६२-१६८१) – हे स्वराज्याचे राज्याभिषेकानंतरचे पहिले अधिकृत पेशवे , ह्यांनी साल्हेर , जावळी , प्रतापगड , जामनगर , बुऱ्हाणपूर , तळकोकण इत्यादी लढायांत त्यांनी विशेष कामगिरी निभावली.
    5. निळकंठ मोरेश्वर उर्फ निळोपंत पिंगळे (१६८१-?) – ह्यांनी शंभुराज्यांच्या काळात हरजीराजे महाडिक यांच्यासह कर्नाटकात अनेक लढाया केल्या व शंभुराज्यांंनन्तर मिरजेच्या युद्धात मारले गेले.
    6. परशुराम त्र्यंबक कुळकर्णी (?-१७०१) – ह्यांची पेशवे म्हणून कारकीर्द फार छोटी होती.
    7. भैरवजी मोरेश्वर उर्फ बहिरोजीपंत पिंगळे (१७०१-१७१३) – प्रतिनिधी पदामुळे पेशवे पद फक्त नावाला उरले होते ह्यांच्या काळात . ह्यांनी ताराबाईविरुद्ध शाहूंचा पक्ष घेतल्याने त्यांना कान्होजी आंग्रेने १७१३ मध्ये कैद केले जेथून बाळाजी विश्वनाथ यांनी त्यांना सोडविले.
    8. बाळाजी विश्वनाथ भट (१७१३-१७२०) – शाहूंचा पक्ष घेऊन त्याकडे आंग्रे , जाधव यांच्यासारख्या मुत्सद्दी लोकांना वळविण्यात यांचा मोठा वाटा होता , तसेच ह्यांनी दिल्लीत जाऊन बादशहा कडून चौथाई , सरदेशमुखि तर मिळविलीच पण राजमाता येसूबाई यांना १७१९ मध्ये सोडवून आणले व दगदग सहन न झाल्याने सासवडला वारले.
    9. विश्वास बल्लाळ उर्फ बाजीराव भट (१७२०-१७४०) – याने आयुष्यात ४० मोठ्या लढाया केल्या ज्यात प्रामुख्याने साखरखेड , दभोई , बुंदेलखंड , पालखेड , भोपाळ , खरगोन इत्यादी होत्या , याच्याकाळात मराठ्यांनी नर्मदेच्या उत्तरेत राज्यविस्तार सुरू करत दिल्ली गाठली , इराणच्या बादशहा नादिरशाह चे आक्रमण थांबवायला जाताना खरगोनच्या युद्धानन्तर रावेरखेडीस हा वारला.
    10. बाबूजी नाईक बारामतीकर जोशी (१७४०-१७४०) – हा बाजीरावाची बहीण भिऊबाईचा नवरा ज्याच्याकडून शाहूंनी कर्ज काढल्याने यास तात्पुरती पेशवाई दिली.
    11. बाळाजी बाजीराव उर्फ नानासाहेब भट (१७४०-१७६१) – याने साताऱ्यास अनेक राजकरणं केलीत , भट घराण्यास छत्रपतींकडून वंशपरंपरागत पेशवाई घेतली , तुळाजी आंग्रेचे आरमार बुडविले , उदगीर येथे निजामास हरविले , याच्या काळात अटकेपार झेंडा रोवल्या गेला पण शेवटी पानिपतच्या युद्धाच्या पराभवाला कारणीभूत स्वतःस समजून ते पुण्यात वारले.
    12. माधवराव बल्लाळ भट (१७६१-१७७२) – राक्षसभुवनला निजमास , दक्षिणेत हैदर अली व सावणुर च्या नवाबास यांनी हरविले , यांनी कष्टाने पानीपत नंतरची विस्कटलेली राज्याची घडी बसवून पुनः मराठ्यांना वैभव मिळवून दिले , राजयक्ष्म रोगाने हे थेऊरला वारले.
    13. नारायण बल्लाळ भट (१७७२-१७७३) – अननुभवी असल्याने यांचे चुलते रघुनाथ बाजीराव उर्फ राघोबादादा यांने कट करून यांची अनंत चतुर्दशीला शनिवारवाड्यात हत्या करविली.
    14. रघुनाथ बाजीराव उर्फ राघोबादादा भट (१७७३-१७७४) – दरबारातील बारा विशेष सरदारांनी मिळून बारभाई कारस्थान केले व यांना पदच्युत केले.
    15. माधव नारायण उर्फ सवाई माधवराव भट (१७७४-१७९५) – वयाच्या ४० व्या दिवशी हे पेशवे झाले पण त्यांच्या नवे बाळाजी जनार्दन भानू उर्फ नाना फडणवीस कारभार पाहत , यांच्याच काळात इंग्रजांशी पहिल्या युद्धात मराठे जिंकले व नंतर खर्ड्यास निजामास हरविले , यानंतर नानास कंटाळून पेशव्यांनी पुण्यात आत्महत्या केली.
    16. बाजीराव रघुनाथ भट (१७९५-१८१८) – यांच्या काळात राज्यास उतरती कळा लागली व तैनाती फौजेचा करार यांनी १८०२ मध्ये दौलतराव शिंद्यांपासून रक्षणार्थ केला ज्याने मराठे इंग्रजांकडून हरले , पुढे पुन्हा १८१८ मध्ये हरले व मराठेशाही संपली व पेशव्यांना विठूरला मरेपर्यंत (१८५१) रहावे लागले.
    17. गोविंद बाजीराव उर्फ नानासाहेब भट (१८५१-१८५७) – १८५७ च्या स्वातंत्र्य संग्रामानंतर यांनी नेपाळमध्ये आश्रय घेतला.

साभार –  मराठा स्वराज्यातील वीर

Leave a comment