महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २६५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा.

करवीर रियासत, कोल्हापूर | बखर संस्थानांची

By Discover Maharashtra Views: 3131 6 Min Read

करवीर रियासत, कोल्हापूर | बखर संस्थानांची –

मराठा राज्यसंघातील प्रमुख घटकराज्यांपैकी एक महत्वाच राज्य म्हणजे करवीर रियासत ऊर्फ कोल्हापूर. देवीच्या साडेतीन शक्तीपीठा पैकी‍ एक शक्तीपीठ. प्रलयकाळात देवीने आपल्या हातांनी (करांनी ) या शहराला उचलून  दुसरीकडे सुरक्षित ठेवले म्हणून करवीर किवा करवीर पीठ असेही म्हंटले जाते. या शहराचे मूळ  इ स २२५ते १२१० या कालखंडात सापडते. या प्रदेशात वाकाटक ,कदंब, शूद्रक व मौर्य यांची सत्ता होती . नंतर चालुक्य  ,राष्ट्रकूट व शिलाहारांची सत्ता होती. १२१० मध्ये शिलाहारांचा पराभव देवगिरीच्या यादवांनी केला.पुढे  यादवांचा पराभव होऊन मुस्लीम सत्तेचा अंमल होऊन बहामनी सलतनीच्या राजवटीत हा प्रदेश गेला.

पुढे १६५९ साली शिवाजी महाराजांनी  पन्हाळा स्वराज्यात सामील केला. आदिलशाहीने काढलेल्या मोहिमेत पन्हाळा १६६० खाली त्यांच्या ताब्यात गेला. १६७३ साली महाराजांनी पन्हाळा व कोल्हापूर परत स्वराज्यात सामील केला.

पन्हाळाकिल्ला हा करवीर संस्थानाच्या जडण घडणीत महत्वाचा साक्षीद‍ार होता. संभाजी महाराजांनी पन्हाळ्याहून नजरकैदेतून सुटका करून रायगडावर येऊन राजारामांना पदच्चुत करून मराठ्यांचे छत्रपतीपद मिळवले. १६८९ मध्ये संभाजी महाराजांच्या हात्ये नंतर ‍राजाराम महाराज गादीवर आले .पुढे औरंगजेबाच्या सैन्याने रायगडला वेडा घातला असता राजाराम महाराज तेथून निसटून जिंजीला गेले. पुढे सिंहगडावर त्यांचे निधन झाले. राजाराम महाराजांच्या निधना नंतर त्यांची पत्नी ताराबाईसाहेब यांनी आपला पुत्र शिवाजी द्वितीय याला सातारा गादीवर बसवले.

१७०७ साली ओरंगजेबाच्या मृत्युनंतर मोघलांच्या कैदेत असलेले संभाजीपूत्र शाहू यांची सुटका होऊन ते मह‍ाराष्ट्रात आले.  शाहू हेच मराठा राज्याचे खरे उत्तराधिकारी आहेत असे  आनेकांना वाटू लागले.त्यातच ऑक्टंबर महिन्यात साताराच्या गादीवर हक्क सांगण्यासाठी ताराबाईसाहेब व शाहू यांच्यात लढाई झाली.यात शाहूंचा विजय झाल्यावर त्यांनी  सातारा ताब्यात घेऊन राजाभिषेक करवून घेतला त्यावेळी ताराबाईसाहेब पन्हाळा रांगणा वरून कोकणात गेल्या .शाहूंच्या अक्रमणाला रांगण्याने खिळ टाकली व शाहू परत सातारा येथे आले. ताराबाईसाहेब कोल्हापुरास  परत आले. शाहूंच्या ताब्यातील पन्हाळा त्यांनी परत जिंकला व परत एकदा कोल्हापूर ताराबाईसाहेबांन कडे परत आला.

तारबाईसाहेबांनी मराठा राज्याच्या छत्रपतींच्या दुस-या पातीची स्थापना करुन राज्याला बळकटी देण्याच काम केल.१७१० नंतर बिघडत चाललेल्या परिस्थिती ने १७१४ साली कोल्हापूरात पन्हाळ्यावरील राजवाड्यातील राज्यक्रांतीत सत्तांतर होऊन द्वितीय संभाजी गादीवर आले.( १७१४ – १७६० ) या मध्ये शाहू सोबत १७३१ मध्ये वारणेजवळ निर्णायक लढाई होऊन यात कोल्हापूरच्या संभाजीराजे यांचा पराभव झाला. लढाई जिंकून ही त्यांनी तह केला व राजशिस्टाचार सांभाळून  ‍कोल्हापूर व सातारा यांच्या सीमा नक्की करण्यात आल्या.

कोल्हापूरचा सारा सरंजाम सातारा येथे नेण्यात आला. ताराबाईसाहेबांची परत कोल्हापूरला जाण्याची ईच्छा नसल्याने ते सातारा येथेच राहीले तर राजसबाई व ईतर जणांना पंतप्रधानींनी शाहूंच्या सांगण्यावरून परत पन्हाळा येथे पोहचवले. पुढे सातारा येथेच ताराबाईंच निधन झाल.

संभाजीराजे द्वितीय कोल्हापूर यांच्या नंतर खानवटकर घराण्यातून दत्तक घेतलेले शिवाजीराजे तृतिय यांची कोल्हापूर गादीवर नियुक्ती झाली. ( १७६२ – १८१३) .

शिवाजीराजे तृतीय यांच सिधोजीराव यांच्याशी वैर असल्यान पटवर्धंनी घातलेल्या कोल्हापूरच्या वेढ्यात सिधोजीरावांनी कोल्हापूरात धुमाकाळ घालून शिवाजी राजे यास उपद्रव दिला व कोल्हापूरचा काही भाग जिंकला.

या सर्व घटनांवर ब्रिटीश ईस्ट कंपनी लक्ष ठेऊन होती. संधी मिळताच एलफिस्टनने कोल्हापूरच्या राजांना सिधोजीरावा विरुध्य मदत करण्यासाठी संधी साधून त्यांच्याशी वाटाघाटी करून १८१२ साली तह‍ची कलम केली. यात कोल्हापूर राज्य ब्रिटीशांचे अंकित संस्थान म्हणून बनत चालले. यात पुढे १८१३ साली शिवाजीराजे यांच निधन झाल. पुढे कोल्हापूर गादीवर संभाजीराजे तृतीय हे गादीवर आले. (१८१३ -१८२१ ) हे आबासाहेब म्हणून जास्त प्रसिध्द होते. या राजसत्तेला मर्याद‍ा आल्याने किरकोळ भांडण सुध्द‍ा जोर धरत होती.यात आबासाहेबांची हत्या झाली.

आबासाहेबां नंतर शहाजी महाराज गादीवर आले (१८२१ -१८३८) . य‍ांच्यात पण इंग्रज सरकार बरोबर तहनामे होऊन कोल्हापूरचे लष्करी सामर्थ्य कमी झाले व मुलकी कारभारातील सत्तापण कमी झाली. शहाजीमहाराज ( बुवासाहेब ) यांच्या नंतर कोल्हापूर च्या गादीवर शिवाजीमहराज चौथे ( बाबासाहेब ) गादीवर आले. (१८३८ -१८६६ ) यात शैक्षणिक व सामाजिक विकास झाला व्यापार व दवाखाने चालू झाले. बाबासेबांच्या निधना नंतर पाटणकर घराण्यातून राजाराम महाराज कोल्हापूर गादीवर  दत्तक आले . ( १८६६ -१८७० ). नंतर शिवाजी महाराज पंचम यांची कारकीर्द ( १८७१ -१८८३ ) येवढी झाली.त्यांचे अहमदनगरच्या किल्यात निधन झाले.

त्यानंतर घाटगे कागलकर  घराण्यातील यशवंत  दत्तक घेऊन त्याचे नाव शाहू ठेवण्यात आले.१८९४ रोजी शाहूमहाराजांना कोल्हापूर संस्थानचा राज्याधिकार मिळाला. १९०० साली महाराजा ही उपाधी लावण्याचा अधिकार मिळाला. १९१९ साली राजर्षी हि उपाधी बहाल करण्यात आली.त्यांच्या कारकिर्दीत कोल्हापूरची ओळख एक प्रगतशील संस्थान म्हणून ओळखले जाऊ लागले. या संस्थानाला ब्रिटीश राजवटीने एकोणीस तोफांच्या सलामींचा मान दिला होता.  १९२२ मध्ये राजर्षी शाहूमहाराज यांच निधन झाले.

कोल्हापूर च्या गादीवर त्यांचे पुत्र राजाराम महाराज दुसरे गादीवर आले.  (१९२२ -१९४०) . त्यानंतर प्रतापसिंह दत्तक पुत्र हे गादीवर आले .हे शिवाजी सहावे असे नाव ठेवण्यात आले. (१९४२ -१९४६ ) .पुढे १९४७ रोजी परत एकदा दत्तकविधान झाले व विक्रमसिंह ऊर्फ शहाजीराजे द्वितीय  हे गादीवर आले.कोल्हापूर संस्थानचे स्वतंत्र भारतात विलीनीकरण करण्याच काम यांनी केल. १९४९ रोजी विलीनीकरणाची प्रक्रिया पुर्ण झाली. (१९४७ -१९४९) .पुढे १९८३ रोजी त्यांच निधन झाल.

कोल्हापूर संस्थानांत विशाळगड, बावडा, इचलकरंजी, कागल या चार महत्वाच्या जहागिरी असून, त्या त्या जहागिरदाराच्याकडून त्यांचा कारभार चालविला जातो. खुद्द कोल्हापूर संस्थानांत सहा पेठ व तीन महाल आहेत.

(माझ्या संग्रहात असणारे कोल्हापूर संस्थानचे करवीर रियासत स्टँप पेपर व जहागीरीतील बावडा , इचलकरंजी, कागल व विशाळगड येथील मोडी लिपीतील स्टँप पेपर.)

संतोष मु चंदने, चिंचवड,पुणे.

1 Comment