सरसेनापती धनाजीराव जाधवराव | अपरिचित मावळे

By Discover Maharashtra Views: 6128 4 Min Read

अपरिचित मावळे | सरसेनापती धनाजीराव जाधवराव

जन्म – इ स १६४९
मृत्यू – इ स १७१०

धनाजी जाधवराव हे मराठा साम्राज्याचे इसवी सन १६९७ ते १७०८ या काळात सरसेनापती होते. त्यांनी संभाजी महाराजांच्या तसेच राजाराम महाराजांच्या मृत्यूनंतरही मराठ्यांच्या स्वातंत्र्यलढ्याची धुरा वाहिली. सरसेनापती संताजी घोरपडे यांच्यानंतर धनाजींनी सरसेनापती पदाची सूत्रे हाती घेतली. शाहू महाराजांना छत्रपती बनवण्यात धनाजींचा मोठा वाटा होता.

छत्रपती राजाराम महाराजांनी जिंजी सारख्या ८००-९०० मैल दुर असलेल्या प्रदेशातुन महाराजांनी ओरंगजेबाविरुध्द दोन आघाड्या उघडल्या होत्या. जवळ पैसे नाही, सरदार नाही, सैन्य नाही अशा काळात सरदारांना परत बोलाविन्यासाठी त्यांनी वतनदारी द्यायला सुरु केली. वतनदारीच्या आमिषा मूळे परत जुने लोक स्वराज्याला सामिल होऊ लागले. एवढीच एक काय ती चांगली गोष्ट. राज्यात दुष्काळ व मोगलांची जाळपोळ यामूळे राज्यात गुन्हेगारी प्रचंड वाढली. यावर त्यांनी एक सरदारच नेमला जो गावागावत फिरुन गुन्हेगारास शासन देई. राज्य कर्जबाजारी झाले. महाराजांनी हुंड्याचा रुपात वतने द्यायला सुरुवात केली. आणि ईथुनच राज्यावरच्या एकछत्री अंमल संपायला सुरुवात झाली. वतनाप्रमाने सरदार स्वतः फोज फाटा बाळगी व जेव्हा राजाला गरज पडली तेव्हा त्याचा साह्यास जाई. ह्यात झाले काय की ते वतनदार त्यांचा वतनापुरते राजे बनले.

त्यांचा सैन्यात जे शिपाई असत त्यांचे ईमान हे मुख्य राजा सोबत नसुन वतनदारासोबत असे त्यामूळे “स्वराज्य” ही कल्पनाच नष्ट झाली व वतनदारीस सुरुवात् झाली. अवघड लढाई दिसली की हे वतनदार स्वराज्याकडे पाठ फिरवीत व मोगलांना जाउन मिळत. एकच वतन अनेक लोकांना यामुळे दिले गेल व भलत्याच भानगंडींना स्वराज्याचा न्यायाधिशाला नंतर सामोरे जावे लागले.
धनाजी जाधवराव , संताजी घोरपडे हे दोघे सरदार होते ,दोघेही देशप्रेम नावाची चिज बाळगुन होते. ह्या दोघांनी परत गनिमी कावा सुरु करुन थोरल्या महाराजांप्रमाने अकस्मात हल्ले करायला सुरु केले. ह्या दोघांसोबत हुकुमतपन्हा, प्रतिनिधी, घोरपडे बंधु (बर्हीर्जी व मालोजी) ह्या सरदारांनी अनेक छोट्या आघाड्या उघडल्या. दिवस रात्र पायपिट करुन ही लोक हल्ले करुन अकस्मात माघार घ्यायची. “स्वराज्य” ही कल्पना टिकवुन ठेवन्यासाठी ह्या लोकांनी अहोरात्र मेहनत घेतली.

राजाराम महाराजांच्या काळात धनाजी जाधवराव यांनी फलटण च्या मैदानात बादशहाच्या फौजेशी हमरीतुमरीची लढाई देवून शास्तेखानरणमस्तखान यांचा पाडाव केला या पराक्रमावर खुश होवून छत्रपती राजाराम महाराजांनी धनाजी जाधवराव यांचा सन्मान केला. त्याची एक नोंद मिळते ती अशी
” वर्तमान छत्रपतीस कळलेवर जाधवराव यांस भेटून बहुमान वस्रे ,भूषणे देवून ‘जयसिंगराव’ हा किताब दिला ”

राजाराम महाराजांचा मुक्काम हा पन्हाळगडावर सप्टेंबर महिन्याच्या अखेर पर्यंत होता, २६ सप्टें १६८९ या दिवशी राजाराम महाराजांनी पन्हाळगडावरून गुप्त वेश धारण करून पलायन केले. राजाराम महाराज पन्हाळगडावर असताना संताजी घोरपडे आणि धनाजी जाधवराव यांनी मोघली सैन्यावर छापे घालण्यास सुरवात केली. त्याची एक नोंद मिळते ती अशी
“…. शत्रूस उपद्रव करण्या हेतू रामचंद्रपंत यांच्या आज्ञेनुसार संताजी घोरपडे, आणि धनाजी जाधव यास शेख निजामावर पाठवले, निजामाला जिंकण्यासाठी गेलेल्या संताजी घोरपडे आदिकांनी प्रथम निजामाचा पराभव करून नंतर त्याचे हत्ती-घोडे पुष्कळ द्रव्य हरण केले. तेव्हा अंगावर जखमा झालेला निजाम जीव वाचवून पळून गेला”
राजाराम महाराज चंदी प्रांतात(जिंजी) जाताना धनाजी जाधवराव यांनी मोठा पराक्रम केला म्हणून त्यांना ‘ साहेबनौबत ‘ हे पद दिले ,पुढे काही कारणास्तव सरसेनापती संताजी घोरपडे यांच्यावर इतराजी झाली त्यावेळी सेनापती पद धनाजी जाधवराव यांच्याकडे दिले.

इ.स १७०६ मध्ये सरसेनापती धनाजी जाधवराव आपल्या १५००० खड्या फौजेस घेऊन गुजरातेत गेले होते व त्यांनि बादशहाच्या हंगामी सुभेदारास (अब्दुल हमीद) कैद करून मोगली सैन्याची दाणादाण उडवुन प्रंचड लुट घेऊन तो स्वराज्यात परत आले होते.
मोगलांपासून सुटका झाल्यावर शाहूराजे सैन्य गोळा करीत खानदेश मार्गे सातार्यास पोहचले. राजाराम महाराजांची पत्नी महाराणी ताराबाईने शाहूराजांचा गादीवरील हक्क अमान्य केला; तथापि शाहू महाराजांनी स्वत:स सातार्यास राज्येभिषेक करविला (१२ जानेवारी १७०८) . शाहू महाराज हेच खरे वारस आहेत म्हणून धनाजी जाधवराव यांनी शाहू महाराजांचा पक्ष स्वीकारला होता.

Leave a comment