महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २६५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा.

150 वर्ष जुने घंटाघर | क्लॉक टॉवर, अमरावती

By Discover Maharashtra Views: 1219 3 Min Read

150 वर्ष जुने घंटाघर (क्लॉक टॉवर), अमरावती –

अमरावती शहरातील प्रसिद्ध 150 वर्ष जुने घंटाघर घड्याळ उर्फ क्लॉक टॉवर ही तत्कालिन इंग्रज अधिकाऱ्यांनी दिलेली देणगी होय . त्या काळात सिव्हिल सर्जन व चीफ एक्झीक्युटीव्ह इंजिनीअर हे अधिकारी सरकारनियुक्त नगरपालिकेचे सभासद असत .

इ .सन १८७०-७१ चे सुमारास मेजर जे . टी . व्यु सबॉय हा डेप्युटी कमिश्नर व त्या नात्याने नगरपालिकेचा अध्यक्ष होता तसेच त्या वेळ चा पी . डब्ल्यु . डी . खात्याचा चीफ इंजिनीअर आर डब्ल्यु . वुडहाऊस हा होता व तो सरकारनियुक्त नगरपालिकेचा सभासदही होता . ‘ मुंबईच्या राजाबाई टॉवरप्रमाणे येथेही एक टॉवर बांधावा ‘ ही कल्पना या अधिकाऱ्यांनी मांडली आणि त्यासाठी हल्ली जेवढा जोग चौक आहे ती चौरस जागा रिझर्व करायला लावली . मध्ये घड्याळ असलेले टॉवर व त्या सभोवती बाग असावी अशी त्याची मूळ कल्पना होती . त्याप्रमाणे त्यावेळी सुमारे दोन हजार रूपये खर्चुन नगरपालिकेने , पी . डब्ल्यू . डी . च्या . देखरेखीखाली हे घंटी घड्याळ बांधविले . त्यावर जी मोठी घड्याळे बसविली ते अमरावती मधील गणपतराव मिस्त्री या गृहस्थानी बनविले . ही घड्याळ प्रत्येक तासाला गजर ( घंटा ) देत असत . बगिचा मात्र शेवटी झाला नाहीच ; कंपौंडवॉल फक्त बांधल्या गेली .

त्यावेळी शहराच्या अगदी नजीक असा हा सुंदर बगिचा व तासातासाला किती वाजले हे सांगणारे घड्याळ असलेले उंच टॉवर अशी वुडहाऊसची कल्पना होती पण घंटीघर बांधल्या नंतर बगीचाची कल्पना तशीच राहिली . पुढे घड्याळही बंद पडले, दि २६ ऑक्टोबर १८७२ रोजी टॉवर क्लॉक दुरुस्त करावा आणि त्याला किल्ली देने  व इतर देखभाल करणे या कामा साठी दर महा ५ रुपये पगारावर मानूस नेमावा असा ठराव अमरावतीच्या नगरपालिके तर्फे घेण्यात आला, आणि दुसऱ्या एका ठराव नुसार लोकांचे मनोरंजनासाठी , घंटी घड्याळ जवळ आठवड्यातून दोनदा बँड वाजविला जाई . परंतु एप्रील १८९३ नंतर हा बॅन्ड आठवड्यातून फक्त एकदाच , दर शनिवारी सायंकाळी वाजविण्यात यावा असा नगर पालिकेने निर्णय घेतला होता . पण पुढे हा निर्णयही बदलून मे १८९४ मध्ये , बॅन्ड वाजविणे बंद करावे असा ठराव करण्यात आला .

कित्येक वर्षे लोटलेट पण त्या टॉवर वरील घड्याळ कधीही दुरुस्त होऊ शकले नाही . आणि शहराच्या शोभेची व उपयोगाची ही मूळ कल्पना या टॉवर प्रमाणेच खिन्न मनाने शहराकडे ” कधीतरी जीर्णोद्धार होईल ‘ या आशेने आजही पाहत आहे .

संदर्भ:- अमरावती शहराचा इतिहास ले. भि. दे. कारंजकर.

शिवा श्रीकृष्णराव काळे
स्वराज्य सेवा प्रतिष्ठान

Leave a comment