स्वराज्य संकल्पक महाबली शहाजी राजे

By Discover Maharashtra Views: 4334 10 Min Read

स्वराज्य संकल्पक महाबली शहाजी राजे

श्री. मालोजीराजे भोसले यांची पत्नी भोसले दीपाबाई (उमाबाई) हिच्या पोटी सिंदखेड येथे शहाजीराजे यांचा जन्म १५ मार्च १५९४ रोजी झाला.(शहाजींच्या जन्मतारखेबद्दल इतिहासकारात मतभेद आहेत.) काहींच्या मते मालोजी भासले यांची मुख्य राणी उम्मवा साठे यांची कन्या उमा ही असून तिच्या पोटी शहाजीराजे आणि शरीफजीराजे यांचा जन्म झाला. तर अनेकांच्या मते फलटणच्या वणगोजी निंबाळकर यांची कन्या दीपा ह्या शहाजी व शरीफजी यांच्या माता होत अशी माहिती मिळत आहे.
पुढे इ.स. १६६१ – इ.स. १६६२ दरम्यान शहाजी राजे महाराष्ट्रात आले होते. त्यांनी त्यानंतरचा काही काळ मुलगा छत्रपती शिवाजीराजे आणि पत्नी जिजाबाईं समवेत घालवला. आपण संकल्पित केलेल्या आणि लावलेल्या स्वराज्याच्या रोपट्याचा आज विशाल वटवृक्ष झाल्याचे पाहून ते धन्य झाले. मग काही काळानंतर ते पुन्हा आपल्या जहागिरीत परतले.
शहाजी राजेना शिकारीला जाणे खुप आवडायचे.

२३ जानेवारी १६६४ होदेगिरी, कर्नाटकात रयतेच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी शहाजीराजे नेहमी तत्पर असत. होदेगिरीच्या जंगलातील नरभक्षक वाघांचा रयतेला त्रास होत असल्याची खबर त्यांच्या कानावर येताच त्यांनी वाघांचा बंदोबस्त करण्याचा निर्णय घेतला. शहाजीराजे जंगलात वाघाच्या शिकारीला गेले. अशाच एका नरभक्षक वाघाचा पाठलाग करताना वेगात असणाऱ्या त्यांच्या घोड्याचा अचानक दुर्दैवी अपघात झाला आणि शहाजीराजे घोड्यावरुन कोसळले. या अपघातात त्यांचे निधन झाले. रणांगण गाजवणारा लढवय्या वयाच्या सत्तरीत रयतेचे प्रश्न सोडवत असताना मरण पावला. कर्नाटकातील होदेगिरी जंगलात त्यांचे स्मारक आहे. माघ शुद्ध ५, म्हणजेच २३ जानेवारी इ.स. १६६४ रोजी होदेगिरीच्या जंगलात शिकारीला गेले होते. शिकारीवर असताना त्यांच्या घोड्याचा एका वृक्षवेलीमध्ये पाय अडकला व ते खाली कोसळले आणि त्यातच तेथे त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.
छत्रपती शिवाजी महाराजांचे सावत्र भाऊ व्यंकोजीराजांनी राज परंपरेप्रमाणे शहाजीराजांची उत्तरक्रिया केली व समाधी शिमोग्याजवळ होदिगेरी येथे बांधली.

भोसले घराण्याची पार्श्वभूमी –
राजस्थानच्या चित्तोडगढच्या संग्रामात मुस्लीम आक्रमक अल्लाउद्दीन खिलजीशी लढताना राणा लक्ष्मणसिंह नावाचा सेनानी आपल्या सात मुलांसह धारातीर्थी पडून मरण पावले. पुढे याच वंशातील भैरोसिंह उर्फ भोसाजी हे त्यांच्या कार्यक्षेत्रात महान कार्य करून गेले. त्यांच्यामुळेच या वंशाला घराण्याला पुढे ‘भोसले’ हे नाव प्राप्त झाले.
याच वंशात पुढे वेरुळ स्थित बाबाजीराजे भोसले यांच्या घरात मालोजीराजे भोसले आणि उमाबाई भोसले यांच्या पोटी शहाजीराजे यांचा जन्म झाला. आणि त्यांच्या जन्माच्या वेळी त्यांच्या मातोश्री उमाबाईंनी अहमदनगरजवळील शहाशरीफ पीराला नवस बोलल्यामुळे त्यांनी आपल्या दोन्ही मुलांची नावे शहाजी व शरीफजी अशी ठेवली. अशी आख्यायिका सांगितली जाते आहे.

पुढे सिंदखेडराजा येथील लखुजीराव जाधव यांच्या मुलीशी म्हणजेच जिजाबाईंशी शहाजीराजे यांचा डिसेंबर इ.स. १६०५ मध्ये विवाह झाला. या वेळी लखुजीराव व मालोजीराजे हे दोघेही निजामशाहीत नोकरीस होते. पुढे लगेचच मालोजीराजांचा अकस्मात दुर्दैवी मृत्यू झाला. कालांतराने जसेजसे शहाजीराजे मोठे होत गेले, तसतशी पराक्रम, राजकारण, मुत्सद्देगिरी या बाबतीत त्यांची कीर्ती वाढत सर्वदूर पसरत गेली. त्यामुळे त्यांचे नाव आदराने घेतले जाऊ लागले.

शहाजीराजे मालोजीराजे भोसले सविस्तर –
पूर्ण नाव – शहाजीराजे मालोजीराजे भोसले
पदव्या – सरलष्कर
जन्म – मार्च १५, इ.स. १५९४
मृत्यू – जानेवारी २३,इ.स. १६६४ होदिगेरे (चन्नागरी जवळ)
उत्तराधिकारी- व्यंकोजी भोसले तंजावुर
छत्रपती शिवाजीराजे भोसले पुणे,
वडील – मालोजीराजे भोसले
आई – उमाबाई
पत्नी – जिजाबाई तुकाबाई
संतती – संभाजीराजे भोसले (थोरले),
छत्रपती शिवाजीराजे भोसले,
व्यंकोजी भोसले, कोयाजी, सन्ताजी
राजघराणे – भोसले
चलन – होन

शहाजीराजांच्या कारकीर्दीचा आढावा घेतला असता असे लक्षात येते की त्यांनी स्वाभिमान राखत आदिलशाही,मुघलशाही व निजामशाही – या सर्व सत्ताधीशांकडे नोकरी केले.
इ.स. १६२५ ते इ.स. १६२८ – आदिलशाही,
इ.स. १६२८ ते इ.स. १६२९ – निजामशाही,
इ.स. १६३० ते इ.स. १६३३ – मुघलशाही,
इ.स. १६३३ ते इ.स. १६३६ – निजामशाही,
इ.स. १६३६ ते इ.स. १६६४ – आदिलशाही,
अशाप्रकारे त्यांच्या कारकीर्दीचे महत्त्वाचे हे सर्व टप्पे होत.

अहमदनगरच्या निजामशाहीत –
काही काळानंतर मालोजीराजे भोसले आपला भाऊ विठोजीराजे भोसले इ.स.१५७७ मध्ये सहकुटुंब सिंदखेड येथे लाखुजीराजे जाधव यांच्याकडे नोकरीस आले होते. तद्नंतर शहजींचे पिता मालोजीराजे यांनी लाखुजीराजे जाधव यांची नोकरी सोडून इ.स. १५९९ साली अहमदनगरच्या निजामाची नोकरी मिळवली होती. त्यात कार्यरत असताना त्यांना अनेक आव्हानांचा सामना करावा लागला होता.

अहमदनगरच्या भातवडीचे युद्ध –
मोठ्या तयारीनिशी मुघल शहेनशाहने इ.स.१६२४ लष्कर खानला १.२ लाखाचे सैन्यासह निझामशाहीचा खातमा करून कायमस्वरूपी संपवण्यासाठी दक्षिणेस पाठविले होते. त्या वेळी त्यांना आदिलशहा ८० हजाराचे सैन्य घेऊन सामील झाला होता. त्यावेळी शहाजीराजांकडे फक्त २० हजाराचे सैन्य होते. मग त्यातील् केवेळ १० हजार अहमदनगरच्या रक्षणासाठी ठेऊन, उर्वरित १० हजार स्वत:कडे ठेवले. एवढ्या मोठ्या सैन्याला प्रचंड पानण्याची सोया व्हावी म्हणून मुघल आणि आदिलशाही सैन्याने उत्तर्-दक्षिण वहाणा-या मेखरी नदीच्या जवळपास छावणी टाकली. सातत्याने दुष्काळी असलेल्या अहमदनगरला तेव्हा चांगला पाऊस झाला होता. सगळीकडं पाण्याची मुबलकता होती. श्री. शहाजीराजांनी छावणीच्या उत्तरेला असणाऱ्या धरणाला काळजीपुर्वक असे तडे पाडून ठेवले. त्यामुळे रात्री झोपलेल्या मुघल आणि आदिलशाही छावणीला काही कळण्यापूर्वी, समजण्यापूर्वी छावणीची पुर्णपणे वाताहात झाली. अनेक महत्वाचे योद्धे शहाजीराजांचे बंदी झाले, अणि शहाजीराजांचे नाव भारतवर्षात दुमदुमले आणि त्यांचा दरारा वाढला.

याच लढाईत एक दुःखद घटना घडली ती म्हणजे शहाजीराजांचे बंधू शरीफजी धारातीर्थी पडले. हे दुःख राजेंना खूपच त्रासदायक ठरले.

आणि निजामशहीची अखेर –
काही कालावधी नंतर निजामशाहीतील वझीर जहान खानने, निजामाला मारले. आणि शहाजीराजांना निजामशहीत आणले . शहाजहानने दरम्यान काळात सगळ्या निजामशहीतील पुरुषाना ठार केले. या हत्येने निजामशहीला वारस रहाणार नाही याची काळजी घेतली होती. तेव्हा शहाजीराजानी योग्य वेळी निजामाच्या दूरच्या नात्यातील अगदी छोट्या मुर्तझाला गादिवर बसवून स्वत: कारभार हाती घेतला. त्यामुळे जसे जणू स्वतःवरच छत्र धारण केले असे वाटत होते. हा सर्व घटनाक्रम अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील पेमगिरी किल्ल्यावर घडली. त्यांचा हा स्वतंत्र राज्यकारभार जवळजवळ ३ वर्षे चालू होता. शहाजीराजे भोसले यांनी मुर्तझाच्या आईला त्याच्या सुरक्षिततेची हमी दिली.

कोण कसे घाबरते हे सैन्य संख्येने लक्षात येते. त्यादरम्यान शहाजहानने ४८,००० सैन्य निजामशाही, आदिलशही संपवण्यासाठी पाठवली तेव्हा घाबरुन आदिलशहा, शहाजहानला सामिल झाला. शहाजीराजे व निजामशाहीचा टिकाव लागणे शक्य नव्हते, तरीही शहाजीराजेंनी नेटाने लढा चालू ठेवला होता. दरम्यान छोटा मुर्तझा चुकून शहाजहानच्या हाती लागला. तेव्हा शहाजीराजेनी त्याच्या सुरक्षिततेसाठी आणि त्याच्या आईला दिलेल्या शब्दासाठी त्यांनी शहाजहानशी तह केला. या तहांतर्गत मुर्तझा शहाजहानकडे सुरक्षित राहिल आणि शहाजीराजे आदिलशहीत सामील होतील. सावधगिरी म्हणुन शहाजीराजांना दक्षिणेला बंगळूरची परिसरातील जहागिरी दिली. आदिलशाहीत असताना शहाजीराजांनी पुणे परगणा निजामशाहीकडून काबीज केला होता. म्हणून तो सुद्धा त्यांच्याकडेच् ठेवण्यात आला.

शहाजीराजांना बंगळूरचा प्रदेश फार आवडला आणि चांगला वाटू लागला. याच परिसरात एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. शहाजीराजे व त्यांचे थोरले चिरंजीव संभाजीराजे यांनी आपल्या मनातील स्वराज्य संकल्पनेला मूर्त स्वरूप देण्याचे या ठिकाणी ठरविले. ते तसे मुळातच उत्तम प्रशासक व पराक्रमी योद्धे होतेच यात काही महत्त्वाचे म्हणजे योग्य वेळी निर्णय घेण्यात तरबेज होते. त्यानी दक्षिणे असणाऱ्या राजांवर विजय मिळवून दक्षिणेला आदिलशहीचा मोठा विस्तार केला. पण हे करताना त्या हरलेल्या राजाना शिक्षा किंवा देहदंड न करता त्याना माण्डलिक करून ठेवले, जेणे करुन गरज पडली तेव्हा हे राजे त्यांच्या मदतीला धावून आले पाहिजे हा कयास उपयुक्त ठरेल हे जाणून होते.

हिंदवी स्वराज्याची स्थापना
छत्रपती श्री. शिवाजी महाराजांना स्वराज्य स्थापनेसाठी त्यांनी म्हणजे शहाजीराजे यांनी बरीच अनुकूल परिस्थिती निर्माण करून दिली होती. छत्रपती श्री. शिवाजी महाराजांना म्हणूनच त्यांनी योग्य वेळ पाहून पुण्यात पाठवून दिले. त्यावेळी त्यांनी आपल्या जहागिरीवर स्वतंत्र कारभार चालविण्यासाठी शिवाजी महाराजांना पाठवले होते. त्याचबरोबर दादोजी कोंडदेव, बाजी पासलकर, रघुनाथ बल्लाळ अत्रे, कान्होजी जेधे नाईक व सातारचे शिंदे देशमुख यांच्याबरोबर इतर अनेक मातब्बर सरदारांना जय्यत तयारीनिशी शिवाजी महाराजांसोबत राज्यकारभारासाठी पाठवले होते. राज्यकारभारासाठीची आवश्यक राजमुद्राही शहाजीराजांनीच शिवरायांना उपलब्ध करून दिली.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या वाढत्या कारवायांना पायबंद घालण्यासाठी आणि शहाजीराजांची यांस फूस आहे. या संशयाने आदिलशाहीने, मुख्य वजीर नवाब मुस्तफाखान याने बाजी घोरपडे, मंबाजी भोसले, बाजी पवार, बाळाजी हैबतराव, फतहखान, आझमखान यांच्या साहाय्याने शहाजीराजांना दगा फटका देऊन कर्नाटकातील जिंजीजवळ कैद केले. त्यावेळी साखळदंडांनी बांधून भर विजापुरातून शहाजी राजांना दरबारात हजर करण्यात आले. तो दिवस होता २५ जुलै, इ.स. १६४८ चा. हे समजताच छत्रपती शिवाजी महाराजांनी मुत्सद्दीपणाने राजकारण करत दिल्लीत मोगल सुलतान शहाजहानला एक पत्र पाठवले. स्वतः आपण व आपले पिता शहाजीराजे हे दिल्लीपतीची चाकरी करू इच्छितात असे त्यांनी लिहिले. या बदल्यात शहाजी राजांची विजापूरच्या कैदेतून मुक्तता करावी ही अट घातली. अशा प्रकारे शिवाजी महाराजांनी शहाजीराजांच्या सुटकेसाठी दिल्लीच्या बादशहाला मधाचे बोट लावले होते. आणि हा प्रयत्न खूपच यशस्वी ठरला. शहाजीराजांची दि. १६ मे, इ.स. १६४९ रोजी सन्मानपूर्वक सुटका करण्यात आली.

तसेच जेव्हा अफझलखान छत्रपती शिवाजी महाराजांचा बंदोबस्त करण्यासाठी स्वराज्यावर चालून आला तेव्हा, अफझलखानाची दगाबाजी माहिती असल्याने शहाजीराजेंनी १७,००० फौज बिजापुर बाहेर खडी ठेवली होती. योग्य वेळ येताच फौज कूच करेल.

श्री. शहाजीराजे हे आपल्या कारकिर्दित निझाम, मुघल आणि आदिल सत्तेत सरदार म्हणून राहिले होते. तरी त्यान्ची महत्त्वाकांक्षा स्वतंत्र हिंदवी स्वराज्य स्थापनेची होती. त्यानी तसा त्यासाठी दोनदा प्रयत्न केला, पण त्यास यश नाही आले. त्यांचे अपूर्ण राहिलेले स्वप्न पुत्र छत्रपती शिवाजी महाराजांनी (महाराष्ट्र) छत्रपती एकोजी राजे (तन्जावर) यानी प्रत्यक्षात आणले.

Leave a comment