महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. आपली छोटीशी मदत आम्हाला मोलाची ठरेल. 👉Donation/देणगी साठी क्लिक करा.👈 Website Views: 91,64,510

अहमदाबादची लूट – मिरात-ए अहमदी (गुजरातचा इतिहास) मधून भाग १

Views: 5
6 Min Read

बाळाजी विश्वनाथ (पेशवा) : अहमदाबादची लूट – मिरात-ए अहमदी (गुजरातचा इतिहास) मधून भाग १

*फार्सी* (अहमदाबादची लूट)

आमदन बालाजी बिश्वनाथ मरहता ब-अफवाज-ए गिरान व ताख्त नमुदन अक्सर परगनात व मआवदत नमुदन बाद गिरफ्तन दो लक व दू (दह) हजार रुपिया ब-सिग़े खंदनी अज़ बलदे अहमदाबाद
अज़ ऑंजा की पैवस्ते अफवाज-ए बहर अमवाज-ए पादशाही तअक्कुब व ज़द व दस्त मरहता मामुर बूदंद ब-हर जानिब की रुये मी आवर्द व कज़ाफादे दस्त ततावुल ब-ताख्त व ताराज दर अज़ मी करदीद. दर इन वला की रेहलत हजरत खुल्द मकान की बाद सिपरी शूदन पंजाह साल व कसरी ब-अर्जे जहूर आमद अजब तहेलका व तरफे आशुबी दर मुमालिक महरुसे रुख नमूद

*नज्म*

रफ्त ऑंकी बूद खानाए मुल्क उस्तवार अज़ु
रफ्त ऑंकी दाश्त कार जहानी करार अज़ु
खसुसान दर इन सुबा की बिनाबर नज्म व नस्क नाज़ीमान व फौजदारान व थानाबंदी कोलीयान व राजपुतान मुतमर्रीद मानंद रुबाह दर गोशा व विराने खजीदे बूदंद. सर ब-शोरश व फसाद दर दाश्तंद. अलावा आन चूं दखनियान दर मुकदमा अब्दुल हमीद खान चाश्ते खोर इन मुल्क शुदे बुदंद.
दर इन वला बालाजी बिश्वनाथ नामी ब-अफवाज-ए गिरान हमान होश दर सर व हमान दाईयाइ दर जमीर जा दादे अज़ राह जाबुआ आज़ीम इन सुबा गश्त व हम्मा जा ग़ारत कुनान गोधरा पैवस्त. नायब मुहम्मद मुराद खान बख्शी की फौजदारी ऑंजा बे ज़मीमे बख्शीगिरी दाश्त। चूं ताब मकावमत नियावरदे गुजारा गिरफ़्त व ब-दीन ब-हैज अक्सर फौजदारान बर्ख़ास्तंद। मराथा बे कसबे मुंदा रसीदे ऑंजा रा ब-ताख्त दर आवरदा आतिश दाद व इन खबर-ए वहशत असर बरुज़ दो शंबे शशम शहर सफर अल-मुज़फ्फर सना १११९ हजार व सद व नौवजदह अज़ तकरीर आमिल परगना मुहम्मदाबाद की अज़ क़ब्ल ख़्वाजा अब्दुल हमीद खान दिवान सुभा दर ऑंजा बूद रसीद की दखनियान अज़ कसबे नादियाद ब-इन तरफ रसीदे अंद व मुतवातिर व मुतवाली इन मानी ब-सदक मकरून गरदीदा शाइया शूद. दिवान सूबा व बख्शी ब-इत्तेफ़ाक़ यकदीगर नज्द इब्राहिम खान शीताफ्ते जाहर साख्तंद व दीर ब-वुजूह इन जमीद की बालाजी बिश्वनाथ मबलग़हाई खतिर कुली ब-सीग़ा माल आमानी की ब-इस्तिलाह आन्हा खंदनी गोयंद दाईया दारद

*मराठी*

मराठा बाळाजी विश्वनाथ याचे मोठ्या फौजेसह आगमन, त्याने अनेक पारगण्यांवर केलेला हल्ला व अहमदाबाद शहराकडून दोन लाख दहा हजार रुपयांची खंडणी वसूल करून परतणे
समुद्राच्या लाटांप्रमाणे असणाऱ्या बादशाही फौजा ( अफवाज-ए बहर अमवाज-ए पादशाही ) मराठ्यांचा बिमोड करण्यासाठी सदैव तैनात असत, परंतु तरीदेखील मराठे सर्व बाजूंनी येत व लुटालूट करत (ब-हर जानिब की रुये मी आवर्द व कज़ाफादे दस्त ततावुल ब-ताख्त व ताराज दर अज़ मी करदीद.) पन्नास वर्षे राज्य केल्यानंतर हजरत खुल्द मकान ( औरंगजेब) यांचे नुकतेच देहावसान झाल्यामुळे राज्यात सर्वत्र एकच अस्वस्थता आणि खळबळ माजली. ( दर इन वला की रेहलत हजरत खुल्द मकान की बाद सिपरी शूदन पंजाह साल व कसरी ब-अर्जे जहूर आमद अजब तहेलका व तरफे आशुबी दर मुमालिक महरुसे रुख नमूद )

कविता –
घर रुपी राज्याची व्यवस्था कायम व स्थिर ठेवणारा निघून गेला !
जगाचे व्यवहार स्थिर ठेवणारा निघून गेला !

नाझीम, फौजदार आणि ठाण्याच्या कारभार पाहणाऱ्यांनी कायद्याची अंमलबजावणी केल्यामुळे खास करून या सुभ्या मध्ये कान्याकोपऱ्यात व वैराण प्रदेशात कोल्ह्यांप्रमाणे पसरलेले बंडखोर कोळी व राजपूत यांनी परत आपले डोके वर काढले व बंडाळी केली. (खसुसान दर इन सुबा की बिनाबर नज्म व नस्क नाज़ीमान व फौजदारान व थानाबंदी कोलीयान व राजपुतान मुतमर्रीद मानंद रुबाह दर गोशा व विराने खजीदे बूदंद. सर ब-शोरश व फसाद दर दाश्तंद.) दखनी लोकांखेरीज अब्दुल हमीद खान याने देखील या प्रदेशाचा नाश्ता चाखला होता (उत्पन्न घेतले होते – अलावा आन चूं दखनियान दर मुकदमा अब्दुल हमीद खान चाश्ते खोर इन मुल्क शुदे बुदंद. )
या वेळेस तोच मनसुबा (लुटीचा) मनात ठेवून बाळाजी विश्वनाथ मोठी फौज घेऊन झाबुवाच्या मार्गाने या भागात आला ( दर इन वला बालाजी बिश्वनाथ नामी ब-अफवाज-ए गिरान हमान होश दर सर व हमान दाईयाइ दर जमीर जा दादे अज़ राह जाबुआ आज़ीम इन सुबा गश्त) व त्याने सर्व बाजूने लुटालुट करून गोधरा येथे आगमन केले. ( व हम्मा जा ग़ारत कुनान गोधरा पैवस्त.)

नायब मुहम्मद मुराद खान बख्शी याने – ज्याच्याकडे फौजदार आणि बख्शी अशी दुहेरी जबाबदारी होती – बाळाजी विश्वनाथाचा सामना करण्यासाठी पुरेसे सैन्य नसल्याने त्याच्याशी लढण्याच्या विचार सोडून दिला. इतर अनेक फौजदारांनी देखील बाळाजी विश्वनाथाचा सामना न करण्याचे ठरविले.

बाळाजी विश्वनाथ मराठ्याने मुंढा या गावात येऊन लुटालूट केली व गावाला आग लावली ( मराथा बे कसबे मुंदा रसीदे ऑंजा रा ब-ताख्त दर आवरदा आतिश दाद )
सोमवार ६ सफर १११९ हिजरी रोजी ( २८ एप्रिल १७०७) ख्वाजा अब्दुल हमीद खान याच्या वतीने मुहम्मदाबाद परगणा येथे असलेला आमील याच्या मार्फत ही भयंकर बातमी आली. ( औरंगजेब शुक्रवार, २८ जिल्काद १११८ हिजरी, २०/२१ फेब्रुवारी १७०७ रोजी मेला) त्या बातमीनुसार नादियाद कडून दखनी लोक या भागात आले असल्याचे समजले. यानंतर सतत आलेल्या बातम्यांवरून हे खरे असल्याची खातरजमा झाली.
ही बातमी ऐकल्यावर सुभ्याच्या दिवाण व बख्शी असे दोघे मिळून तातडीने इब्राहिम खानाला ही बातमी देण्यासाठी त्याच्याकडे गेले. ( दिवान सूबा व बख्शी ब-इत्तेफ़ाक़ यकदीगर नज्द इब्राहिम खान शीताफ्ते जाहर साख्तंद )
या दोघांनी इब्राहिम खानाला स्पष्ट केले की आपल्या संरक्षणासाठी म्हणून – ज्याला सर्वसाधारण भाषेत खंडणी म्हणतात – मोठी रक्कम वसूल करण्याचा बाळाजी विश्वनाथाचा मनसुबा आहे. ( दीर ब-वुजूह इन जमीद की बालाजी बिश्वनाथ मबलग़हाई खतिर कुली ब-सीग़ा माल आमानी की ब-इस्तिलाह आन्हा खंदनी गोयंद दाईया दारद )

भाग १ समाप्त

सत्येन सुभाष वेलणकर, पुणे

Leave a Comment